Nandanvan Restaurant Amboli

Nandanvan Restaurant Amboli In our family restaurant we serving authentic malwani sea foods alongwith indian chinese & punjabi food

21/04/2017

सागरी किल्ले व बंदरांचा जिल्हा – सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्याच्या तळकोकणातील महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. तेव्हा या जिल्ह्याचे नाव दक्षिण रत्नागिरी असे होते. कालातंराने नामांतर करुन सिंधुदुर्ग असे नाव ठेवण्यात आले. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला गोवा राज्य, पूर्वेला कोल्हापूर जिल्हा तर उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक सागरी किनारा लाभला असून या किनाऱ्यावर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात रस्तेमार्ग व रेल्वेमार्ग वाहतुकीबरोबरच जलमार्गांचा विकास झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. जिल्ह्यात आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट अशी आठ महत्त्वपूर्ण बंदरे आहेत. देवगड तालुक्यातील पुरळ, मिठबांव, तारामुंबरी, मालवण तालुक्यातील आचरा, तारकर्ली, चिवला राजकोट व देवबाग त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील निवती व भोगवे याठिकाणी समुद्र किनारे आहेत.
जिल्ह्यातील रस्तेवाहतुक ही अतिशय खडतर आहे. कोकणातील उंचसखल व दरी डोंगर अशा भूभागामुळे रस्त्यांचा फार विकास या जिल्ह्यात झाला नाही. दक्षिणोत्तर रस्ते वाहतूक त्यामानाने थोडीशी सुलभ आहे. पूर्वेकडील कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी घाटमार्गांचा वापर करावा लागतो. जिल्ह्यातून जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग (National Highway – NH17) या मार्गाला मुंबई-गोवा तसेच पनवेल-कन्याकुमारी (1622 किमी लांब) मार्ग म्हणून ओळखले जाते. हा मार्ग भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जोडतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा हा मार्ग आहे. मुंबई-गोवा-नागरकोविल या रेल्वेमार्गावरील सिंधुदुर्ग हे प्रमुख स्थानक आहे. याशिवाय वैभववाडी, कणकवली व सावंतवाडी जिल्ह्यातील सर्वात इतर रेल्वे स्थानके आहेत..
जिल्ह्यात शेती व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत. त्याबद्दल जाणून घेण्याआधी जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या उद्योगाबद्दल माहिती पाहू या. सावंतवाडी येथे लाकडी खेळणी बनवण्याचा उद्योग चालतो. सावंतवाडीची लाकडी खेळणी जगभर प्रसिध्द आहेत. याशिवाय जिल्हा पर्यटन व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड 1999 मध्ये करण्यात आली. आचार खाडी (बेकवाटर), सिंधुदुर्ग किल्ला, तेरेखोल किल्ला, विजयदुर्ग किल्ला, कुडाळ येथील राऊळ महाराजांचा मठ, सावडाव येथील धबधबा, मालवणचे सुवर्ण गणपती मंदिर, देवगडचा किल्ला व दीपगृह, सावंतवाडी येथील राजवाडा, देवगडेचे कुणकेश्वर मंदिर, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण ही पर्यटनासाठी असणारी प्रसिध्द ठिकाणे आहेत.
आंबा, काजू व फणस ही नगदी पिके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. देवगडचा पायरी आंबा युरोप अमेरिकेतसुध्दा प्रसिध्द आहे. इतर शेतकरी भात, नाचणी व अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेतात. शेती व फळप्रक्रिया उद्योग इथे मोठ्या प्रमाणात विकसित केले जाऊ शकतात.
याशिवाय मासेमारी हा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे. खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासेमारी या जिल्ह्यात चालते. जिल्ह्यात देवगड, आचरा, तेरेखोल, गडनदी, शुक, कर्ली आणि तिल्लीरी या नद्या आहेत. नद्यांमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. मात्र हे प्रमाण कमी आहे. समुद्रकिनारपट्टीवर मासेमारी बंदरावर खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
ओरोस बुदुक्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणाला सिंधुदुर्गनगरी म्हणून सुध्दा ओळखले जाते. महाराष्ट्र सिंधुदुर्ग व रायगड हे केवळ दोन जिल्हे असे आहेत की त्यांची मुख्य ठिकाणे व जिल्ह्याचे नाव वेगवेगळे आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी आणि दोडामार्ग ही या तालुक्यांची नावे आहेत. हा जिल्हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो. जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही. लिंग गुणोत्तरात दर 1000 हजार पुरुषामागे 1056 स्त्रिया असा सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असणारा हा जिल्हा आहे.

15/04/2017

Urgently required waiters/Stewards at Nandanvan Restaurant Amboli.
Salary 4000 to 6000 per month.
Free food and accomodation.
Freshers also welcome.
Contact. 9403350670 : 8975190855

12/09/2016
06/08/2016

आंबोली घाट..परीसर अप्रतिम निसर्गरम्य सौंदर्याची
खाण.
ब्रिटिशांच्या काळात तयार केलेले ल्या या
घाट .. एका स्थानिक ब्रिटिशांना
हा घाटरस्ता कशा पद्धतीने काढावा,
यासाठी मार्ग दाखविला. सद्यःस्थितीत
" ' ही त्याचीच साक्ष मानली
जात आहे. वेंगुर्ले-बेळगाव रस्त्यावर 1868
च्या दरम्यान जकातवाडीत पहिली जकात
घेतल्याची नोंद मिळते. हा घाटमार्ग तयार
करताना तीन भक्कम पूल उभारले आहेत. हे पूल
लोखंडी बीमवर आधारित आहेत.
बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता
म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत
आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन
स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास
करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक
मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा
करणार्या टेकड्या, बाराही महिने
हिरव्यागार असणार्या दर्या.
पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्या
अधिकच सुंदर दिसतात.
सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र
सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड
हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी
संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या
आंबोलीमध्ये अजुनही आपणास संस्थानकालीन
भव्य इमारती पहावयास मिळतात. महात्मा
गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन
शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह
करण्यासाठी याच आंबोली घाटातून मार्गस्त
झाले होते,
तेरा किलोमीटरपैकी 6 किलोमीटर घाट
पूर्णपणे पावसाळ्यात धुक्यात हरवलेला असतो.
पुणे-मुंबई-गोवा आदी ठिकाणांहून पर्यटक
येतात. येथे अनेक धोकादायक वळणे आहेत.
धुक्यामुळे तेथे अपघात संभवतो. दररोज सरासरी
10107.70 टन एवढी वाहतूक होत असली
तर पावसाळ्यात शनिवार-रविवारी
घाटरस्ता गाड्यांनी भरून जातो. या घाटाची
उंची सर्वात जास्त आहे. तसेच दुसऱ्या बाजूने
खोल दरी आहे.
आंबोली - ब्रिटिशांच्या काळात तयार केलेल्या
या घाट मार्ग आहे शत्रूच्या भीतीने
ब्रिटिशांनी संपूर्ण समुद्रकिनारा आपल्या
ताब्यात ठेवला होता. त्याकाळी विमाने
नव्हती. वेंगुर्ले, रेडी, विजयदुर्ग आदी
महत्त्वाची बंदरे होती. बेळगाव हे सैन्याचे
मुख्य केंद्र होते. शिवाय त्या अनुषंगाने माल
वाहतूकही व्हायची. बैलाच्या पाठीवरून
सामानाची ने-आण केली जायची. थकलेल्यांसाठी
विश्रांतीसाठी पारपोली येथे थांबा होता.

Last sunday @ Amboli Waterfall
18/07/2016

Last sunday @ Amboli Waterfall

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुं...
21/05/2016

निसर्गरम्य आंबोली बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट.
पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Raining in Amboli
30/11/2015

Raining in Amboli

14/09/2015

Near Bus Stand, Amboli, India

Address

Near Bus Stand A/p Amboli Sawantwadi Dist Sindhudurga
Savantvadi
416510

Telephone

08975190855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandanvan Restaurant Amboli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share