04/05/2019
हॉटेल रायगड
Hotel raigad Rahuri Factory...
शानिकथा व इतिहास:
श्री शनैश्वरच्या वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संज्ञा होते. संज्ञा ही ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या होती. संज्ञा ही फारच स्वरूपान व रुपवती कन्या होती. दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी करून दिले. संज्ञा सूर्यदेवाचे तेज सहन करू शकत नव्हती. संज्ञेला असे वाटत होते की , मी स्वताच तपश्र्चर्या करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सुसह्य होईल.परंतु सूर्याची ती पतिव्रता नारी होती.सूर्यामुळे संज्ञेला तीन अपत्य झाली १) वैवस्वत मनु २) यमराज ३) यमुना
संज्ञा आपल्या मुलांवर खूप प्रेम करीत होती , परंतु सूर्याचे तेज सहन करू शकत नव्हती. एके दिवशी संज्ञाने विचार केला की सूर्यापासून वेगळे होऊन आपल्या माहेरी जाऊन तिथे तपश्र्चर्या करू अन् तिथेही विरोध झाला तर दूर कुठे तरी एकतांत जाऊन तपश्र्चर्या करून प्रथम संज्ञाने आपल्या तपश्र्चर्येने आपल्या सारख्याच दिसणाऱ्या एका छायेची निर्मीती केली जिचे नाव सुवर्णा ठेवले.सुवर्णाला आपल्या मुलांची जबाबदारी सोपवताना संज्ञा म्हणाली.
" सुवर्णा आजपासून माझ्या ऐवजी तू नारी धर्म संभाळ , अन् माझ्या मुलाबाळांचे पालन पोषण तू स्वतः कर. हे करताना जर काही अडचण आली, तर मला बोलव, मी लगेच येईन , पण एक गोष्ट लक्षात ठेव तू सुवर्णा आहेस संज्ञा नाहीस हे रहस्य कुणालाही कळता कामा नये. "
संज्ञा सुवर्णाला आपली जबाबदारी सोपवून माहेरी निघून गेली. घरी गेल्यावर वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. ऐकताच वडिलांनी संज्ञाला रागवून फटकारले की " न बोलविता मुलगी जर माहेरी आली तर तो दोष पिता-पुत्रीला लागतो. म्हणून तू लगेच आपल्या सासरीसूर्याजवळ जा".. शेवटी ती निब्बिड वनात जो उत्तर कुरुक्षेत्र आहे तिथे शरण गेली. आपल्या सौदर्यांची व यौवनबद्दल तिला भीती वाटत होती. म्हणून तिने " बडवा घोडी " रूप धारण केले ज्या मुळे तिला कुणी ओळखणार नाही. मग ती तपश्र्चर्याला लागली.
इकडे सूर्य व छाया - सुवर्णा ला तीन मूले झाली. पती पत्नी एकमेकाबरोबर खूप प्रेम करीत. त्यामुळे सूर्याला शंकेचे कारणच नव्हते. यांच्या मुलांची नावे अशी - १) मनु २) श्री शनीदेवा ३) पुत्री भद्रा ( तपती )
श्री शनिदेवाच्या उत्पत्ती संदर्भात दुसरी कथा:
श्री शनिदेवाची निर्मीती महर्षी कश्यपच्या यज्ञातून झाली. जेव्हा शनि छाया - सुवर्णाच्या गर्भात होता तेव्हा शिव भक्तीने सुवर्णा ने शिवाची इतकी तपश्र्चर्या केली की, ती आपले खाण पिणं सुद्धा विसरून जात असे. तिच्या अशा तपश्र्चर्येमुळे गर्भातच शनीचा रंग काळा झाला. शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव शनीचा काळा रंग पाहून हैराण झाले. सुर्याला सुवर्णाची शंका आली, अन् लगेच सूर्याने सुवर्णाचा अपमान करीत सांगितले की हा मुलगा माझा नाही.
श्री शनिदेवाच्या अंगात जन्मतः आईच्या तपश्र्चर्या शक्तीचे बळ होते. त्यांनी पहिले की माझे वडील आईचा अपमान करीत आहेत. त्यांनी क्रूर नजरेने पित्याकडे पाहिले, पाहताच त्यांच्या वडिलांच्या शरीराचा रंग सुद्धा काळा झाला. घोडे चालण्याचे थांबले , रथ पुढे चालू शकला नाही, हैराण झालेल्या सूर्यदेवाने शिवाची आराधना सुरु केली, तेव्हा शिवाने सुर्याला सल्ला दिला की, तुमच्या कडून मुलगा व स्त्री दोघांचाही अपमान झाला. यामुळे दोष लागला. लगेच मग सूर्यदेवाने माफी मागितली. परिणामी पुन्हा सूर्यदेवाला सुंदर रूप प्राप्त झाले, व घोडे चालायला लागले. तेव्हापासून श्री शनिदेव वडिलांचे विद्रोही , शिवचे भक्त व माता यांना प्रिय आहे. जनमानसात असे समजतात की सूर्यमालेत जो शनि आहे, तोच श्री शनिदेवाचे प्रतिक आहे. शनिग्रह दगड व लोखंडापासून बनलेला आहे ज्याच्या वरती बर्फाचा थर व द्रवरूप हायड्रोजन मात्रा आहे. शनीचे तेजोवलय ६२००० की.मी. रुद्र व स्थूल रुपाने १०० मीटर आहे.
श्री शनिदेवाचे शनि शिंगणापूर मध्ये आगमन:
आजपासून जवळ जवळ ३५० वर्षापूर्वी श्री शनिदेव हया गावात आले. शनिदेवाची लोखंड व दगडयुक्त दिसणारी काळी - सावळी ५ || फुट उंच व १ || फुट रुंद दिसणारी मूर्ती , जी बाहेर खुल्या अंगणात उन , वारा , पाऊस , थंडीत रात्रदिंवस राहणाऱ्या या मूर्तीच्या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी मला जे सांगितले ते फार विचित्र व अदभूत वाटते. एके दिवशी गावात मुसळधार पाऊस झाला. पाऊस इतका पडला की समोरचे सुद्धा नीट दिसत नव्हते. म्हणे भागातील संपूर्ण शेती वरून पावसाचे , पुराचे पाणी वाहत होते. कुणी कल्पनाच करू शकत नाही की एवढा जोरात पाऊस झाला असावा. परिणामी या गावाच्या आजूबाजूला पूर आला. गावाच्या शेजारीच " पानासनाला " आहे. हया नाल्याला महापूर आला. प्रस्तुत महापुरातच एक मूर्ती वाहून आली. मूर्ती बोरीच्या झाडाला अडकली होती. ही घटना गावापासून फारच जवळ म्हणजे १५० मीटर अंतरावर पूर ओसरल्यावर गुराखी मुले गुरे चरण्यासाठी पानासनाल्याच्या काठी होतेच. त्यांचे अचानक लक्ष बोरीच्या झाडाला अडकून राहिलेल्या मूर्तीकडे गेले. ती भली मोठी मूर्ती पाहून मुलांना खूप आश्र्चर्य वाटले. त्या गुराखी मुलांमधील स्वाभाविक प्रवृत्ती जागी झाली. उत्सुकतेपोटी त्यांच्या हातात असलेल्या काठीने त्यांनी मूर्ती डीवचण्यास सुरवात केली. त्यातील एका गुरख्याने आपल्या हातातील काठी मूर्तीला जोरात टोचली. आश्र्चर्य असे की टोचलेल्या जागेतून आपोआप रक्तस्त्राव होऊ लागला. त्या ठिकाणी व्रण पडला. तोच व्रण अद्याप ही मूर्तीवर पहावयास मिळतो. मूर्तीतून रक्तस्त्राव पडताच गुराखी मुले घाबरली व गुरे तेथेच सोडून गावाकडे पळाली. गावात जाऊन त्यांनी घडलेला प्रकार वडीलधाऱ्या माणसांना सांगितला. हां - हां म्हणता वरील खबर संपूर्ण गावात पसरली. घडलेला चमत्कार पाहण्यासाठी गावातील सर्व लहान मोठी मंडळी धावतच त्या मूर्तीजवळ गेले व त्यांनी तो चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. हया चमत्कारात बराच वेळ गेला. तो पर्यंत सांयकाळ झाली होती. गावकऱ्यांना हे दृश्य पाहून काही निर्णय घेता येईना. म्हणून आता सकाळी बघू असे म्हणून जमलेली सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. परंतु सर्वांच्या मनात रात्रभर पाहिलेल्या त्या चमत्कारचे कुतूहल निर्माण झाले.
त्याच रात्री योगायोगाने चमत्कार पाहण्यासाठी आलेल्या एका भक्ताच्या स्वप्नात श्री शनीदेवांनी दृष्टांत दिला व असे सांगितले की, " काल तुम्ही गावकऱ्यांनी , गुराख्यांनी जे पाहिले ते सर्व सत्य आहे "."आपण कोण आहात ? " - भक्त " मी साक्षात श्री शनिदेव आहे , काल तुम्ही मला जिथे पाहिले तेथून मला उचला आणि गावात माझी स्थापना करा. "
हया भक्ताची झोप उडाली, त्याने स्वप्नात पाहिलेला दृष्टांत गावातील लोकांना कथन केला व त्यानुसार सर्वजण बैल गाडी सह त्या मूर्तीजवळ गेले. अनेक लोकांनी ती मूर्ती बैलगाडीत उचलून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ ? ती मूर्ती जराही जागेवरून हालत नव्हती . आता काय करावे ? शेवटी हताश होऊन मूर्ती आणावयास गेलेले लोक घरी परतले. दुस-या दिवशी त्याच भक्ताच्या स्वप्नात शनि महाराजांनी पुन्हा दृष्टांत दिला. ......." बेटा , काल तुम्ही लोकांनी मला उचलण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही दोन व्यक्ती नात्याने सख्खे मामा-भाचे असलेल्यांनी मला बोराटीच्या काट्याच्या फासावर ठेऊन दोन काळ्या रंगाचे बैल ते सुद्धा नात्याने सख्खे मामा-भाचे असलेल्या जोडीने मला घेऊन जावे. तिथे माझी प्राणप्रतिष्ठा देखील सख्खे मामा-भाचे यांनीच करावी."
लगेच सकाळी भक्ताने ही सर्व माहीती गावकऱ्यांना सांगितले. त्या प्रमाणे काळी बैलजोडी व बोराटीच्या काट्यांच्या फासावर मामा भाच्यांनी ती मूर्ती उचलून ठेवली. जी मूर्ती अगोदर अनेक लोकांकडून उचलली जात नव्हती तीच मूर्ती दृष्टांताप्रमाणे मामा-भाच्यांनी स्पर्श करताच सहज उचलून लोटल्यावर बोराटीच्या काट्यांच्या फासावर चढविली गेली व दृष्टांताप्रमाणे मूर्तीला आणले.
सूर्यपुत्र श्री शनिदेव मृत्युलोकाचा असा स्वामी आहे , कि जो वेळ आल्यावर मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माच्या आधारे त्याला शिक्षा देवून पुनश्च सुधारण्यासाठी प्रेरणा देत असतो म्हणून -
१) श्री शनिदेव आधुनिक युगातील न्यायाधीश आहेत आणि दिलेला न्याय हा बऱ्याच वेळेला आपल्याला अप्रिय वाटतो , म्हणून क्रूर संबोधण्यात येते.
२) श्री शनिदेवाला असलेला काळा रंग, हा एक असा रंग आहे ज्यावर दुसरा रंग चढत नाही.
३) शनीचा धातू लोखंड पोलाद आहे, जो सर्वात उपयुक्त व शक्तिशाली असतो.
४) शनीचा प्रिय छंद -गरीब,दिन,पिडीत लोकांची सेवा करणे व रक्षण करणे.
५) शनीला प्रिय असलेल्या वस्तू - तेल,कोळसा,लोखंड,काळे तिळ,उडीद,चप्पल बूट दान रूपाने प्रदान केले जाते.
६) श्री शनिदेव अध्यात्माचे अधिपती आहेत म्हणून रिद्धी-सिद्धी साठी श्री शनिदेवाची उपासना सर्वश्रेष्ठ होय.
७) श्री शनिदेव भक्ताला कौटुंबिक,सामाजिक, राजनीतिक ,सांस्कृतिक,आध्यात्मिक,प्रशासनिक,व्यापारिक क्षेत्रात मोठ्या पदावर प्रस्थापित करतो.
८) श्री शनिदेव रोगमुक्ती व दीर्घायुष्याची कामना करीत आसतो.
९) श्री शनिदेवाला विपुल नावें आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र विस्तृत व विशाल आहे.
१०) शनैश्वर जगातील एक शाश्वत असामान्य देव होय.
११) शनीचे वाहन लोखंडी रथावरील गिधाड होय.
१२) श्री शनी देवाचे शस्त्र - धनुष्य बाण व त्रिशूल होय.
हॉटेल रायगड. . .
आमच्या चवीला तोडचं न्हाय ...
वाणी मळा, नगर- मनमाड रोड (शिडी - शनी शिंगणापूर रोड) , राहुरी फॅक्टरी,
तालुका- राहुरी, जिल्हा- अहमदनगर.
मोबाईल :८८८८-४१३-७०६
Just dial: https://goo.gl/W5nx4o
Google : https://g.co/kgs/d1cgBf
Web: http://www.hotelraigad.com/
#हॉटेलरायगड