11/01/2026
मी कट्टर मोदी भक्त 2011 ला मोदींचे प्रत्यक्ष भाषण ऐकले अन त्या प्रेरणेने मी देव देश धर्मा च्या सेवेचा विडा उचलला. 2017 च्या निवडणुकीत उस्फुर्त सहभाग घेतला माझ्या सहभागामुळे ते निवडून आले असे मी कधीच म्हणणार नाही. पण ते आज स्वतः च्या नावापुढे जे बिरूद मिरवत आहेत ते जनमानसात रूजवण्याचे काम मी केले.
निवडून आल्यानंतर पुर्ण प्रभागाच्या गल्ल्यांन गल्ल्या पंचविसते तीस वेळा प्रभागातल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी "सकाळी सकाळी नगरसेवक आपल्या दारी" या संकल्पनेच्या नावे फिरवले.
आज ते म्हणतात मी एवढे कोटीची विकास कामे केली मला माहीत नाही कोणत्या उद्देशाने केली.
जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी निधी आणला की स्वतः च्या विकासासाठी.
प्रत्यक्ष वास्तव जनतेला माहीत नसते.
मला सांगा काळे पडळ ते ससाणे नगर रोड या एक ते दिड किलोमीटर च्या पट्टयात मनपाच्या दोन शाळा होत्या, एक खाजगी शिक्षण संस्थेची शाळा आहे तसेच गल्लोगल्ली शाळा आहेत.
काळे पडळ ग्लायडींग सेंटर च्या भिंती जवळ बिल्डर एमेनिटीस्पेस मध्ये इ लर्निग शाळेचे भुमिपुजन झाले. तसेच ससाणे नगर रोडवर एका जागेवर शाळेचे आरक्षण होते. मी स्वतः सुचवले आपला माणुस म्हणून त्या ठिकाणचे आरक्षण बदलून ससुनच्या धर्तीवर अद्यावत 50 ते 100 बेडचे हाॅस्पीटल उभारावे.
आरक्षण बदलता ऐते. महापालिकेत, शहर सुधारणा समिती, स्थायी समितीत ठराव मंजूर करायचा पण त्याला त्या विधानसभेच्या आमदारांची सही लागते.
मुद्दा एवढाच होता त्याचे क्रेडिट यांच्या वरिष्ठ नेत्याला म्हणजे त्या वेळच्या आमदारांना जाईल.
केवळ क्रेडिट दुसऱ्याला जाईल म्हणून तीथे शाळाच बांधण्यात आली आणि हडपसर वासीयांना मनपा हाॅस्पीटल पासून वंचित ठेवण्यात आले. आज चार वर्षे पुर्ण झाली दोन्ही इमारती बांधून पुर्ण झाल्या पण तिथे एकही विद्यार्थाचे एडमिशन नाही की एक ही शिक्षक नियुक्त नाही.
पक्षातल्या एकमेकांच्या कुरघोडीत हडपसरच्या गोर गरीब सर्व सामान्य जनतेचे मुलभुत गरजेवर नक्कीच पाणी फेरले. कारण प्रभागात आता जागाच शिल्लक नाही.
या गोष्टी ला मी विरोध केला तर खड्या सारखा मला बाजूला केला. कट कारस्थान रचून मला पार "मणोरूग्ण" आहे असे दाखवले. राजकिय बहिष्कार टाकला.
मी खुप भोगल सत्य बोलण्याचे.अन मी बोलतच रहाणार भले माझा जिव गेला तरी चालेल कारण चुकिच्या गोष्टींना विरोध करणे ही पण एक प्रकारे देश सेवा आहे.
कारण मी स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेता नाही कारण मी स्वतंत्र भारतात जन्मलो अन नाही मी सिमेवर शस्त्र घेऊन लढू शकत नाही.
जनतेने ठरवावे हे खरच आपल्या मुलभुत गरजांचा विचार करत होते का अजून काही..🙏🙏