22/07/2022
केपीज ग्रेट व्हिजिट ...!!🌹🌹😊
आटपाट नगरीतली कथा वाटावी अशीच ही सत्य कथा सांगतोय... एक छोटं गाव होतं... देश स्वातंत्र्य होऊन दहा एक वर्षे झाले होते... गाव आर्य समाजाच्या विचाराने भारलेलं होतं.. गावकर्ते तो विचार सोबत घेऊन गाव नांदवत होते... जातीच्या उतरंडी होत्या, सोपान परंपरा होत्या... वारकरी संप्रदायाची पताका मातंग समाजाच्या एका आदर्श व्यक्तिच्या खांद्यावर होती... गाव महाराज म्हणून आदर करत होते... महाराजाच्या पदरी एक मुलगा होता, मुलगा लहान असतानाच महाराज अकाली गेले... मुलगा शाळा शिकत होता, तो शिकावा याची तळमळ आणि काहीशी जबाबदारीही गावकर्त्यांनी घेतली.. मुलगा शिकला शिक्षक झाला... मुलगा अत्यंत हुशार आणि इंग्रजी सारख्या साहेबांच्या भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे शाळेतील शिक्षकात सगळ्यात हुशार शिक्षक म्हणून त्यांची गणना होई... काही वर्षांनी स्वतःच्या गावातच बदली झाली मग जिल्हा परिषद शाळेचं गुरुकुल झालं.. गुरुजी फक्त शाळेपुरते न राहता ते शाळेच्या भिंतीबाहेरच्या जगातही शिक्षक म्हणून मुलामध्ये लोकप्रिय झाले... त्यांची मुलंही शिकत होती.. मोठा मुलगा बघता बघता दहावीत मेरिट मध्ये आला... पुढे इंजिनियर झाला.. धडपडणे हे रक्तातच होते.. सिव्हिल इंजिनियर म्हणून कारकीर्द घडत असताना तगड सामाजिक भान अस्वस्थ करत असल्यामुळे देशातली पहिली समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून देणारी वेबसाईट काढली.. प्रतिभेचं नाण अजून खणखणीत झालं.. सुविद्य पत्नी सौ. सीमा कांबळे Seema Kamble शिक्षक म्हणून नोकरीं करायची त्यामुळे घराचं घरपण भक्कम होतं... याच धडपडणाऱ्या गुणातून 2005 साली " डिक्की" अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री स्थापना केली... बघता बघता ही संस्था देशभर पसरू लागली... धडपडणाऱ्या दलित युवकांना / युवतींना आश्वासक हात मिळाला... हे काम बघून 2013 मध्ये भारत सरकारने देशातला प्रतिष्ठित असा पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरव केला.. काम वाढत गेले देशातील 30 राज्यात "डिक्की" च्या शाखा निर्माण झाल्या.. देशातल्या अनेक संस्थ पॅनलवर अभ्यासू सदस्य म्हणून पंतप्रधानांनी नियुक्ती केली.. एवढेच नव्हे तर जम्मू च्या आय. आय. एम. या केंद्रीय संस्थेच्या कौन्सिलिंग बॉडीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी सरकारने दिली... आज देशातल्या प्रतिभावंत लोकामध्ये हे नाव आहे... आणि हे सुपुत्र चोबळी ता. अहमदपूर जि. लातूर या माझ्या गावचे त्यांचे नाव डॉ. मिलिंद प्रल्हाद कांबळे... Milind Kamble हे सगळं लिहताना अभिमान वाटतोय कारण मी हे झाडं रोपटं असल्यापासून वटवृक्ष होई पर्यंत माझ्या नजरेन पाहिलेलं आहे... परवा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या डिक्कीच्या प्रयत्नातून स्टेट बँक ऑफ इंडियाने कचरा वेचणाऱ्या 100 महिलांना ई - रिक्षा दिल्या... त्याच्या चावी देण्याच्या कार्यक्रमाला सहकुटुंबं आले होते.. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना माझी ओळख ग्राम बंधु म्हणून करून दिली... हा माझ्यासाठी मोठा 'किताब होता.. नंतर ते चिरंजीवाने सुरु केलेल्या KPs फूड मॉलला आले... मिसेसला भेटले...हा आनंद अनुभवतांना...घेता कीती दो करानी अशीच झाली होती... 😊😍🌹