28/04/2022
मानवी जीवन आणि मसाला यांचा संपर्क नेमके कधी आला हेच सांगता येणार नाही. परंतु जेव्हापासून तो आला तेव्हापासून तर या विश्वाच्या निर्मितीपर्यंत हा संपर्क असाच राहील या कदाचित कोणाचे दुमत असणार नाही. अमेरिकेच्या शोधात भटकलेला वास्को द गामा नावाचा साहसी नावाडी भारतात पोहोचला, आणि भारतीय मसाल्याचा गंध घेऊन युरोपमध्ये गेला आणि नंतर काय तर युरोप मधल्या लोकांना अक्षरशहा आशिया खंडातील या मसाल्याचं अगदी वेड लागलं, आणि त्यातून नंतरच्या काळात सुरू झालेला व्यापार, व्यापारातून आलेला साम्राज्यवाद ,गुलामी, त्यानंतर ची स्वतंत्र चळवळ ,स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्योत्तर भारत या सर्व प्रवासामध्ये मसाल्याचे पदार्थ नियमित जेवणाचा भाग बनले. आणि जेवणामध्ये अगदी कमी प्रमाण असून सुद्धा जेवणाची चव वाढण्याचं काम मसाले करतात. त्यामुळेच कदाचित एखाद्या गोष्टीची जास्त चर्चा व्हावी त्यासाठी त्याला' "तेल मसाला" नावाचं विशेषण वापरला जाऊ लागले अर्थात हा सर्व प्रवास चालू आहे असाच अविरत सतत चालू राहील. मानवी जगण्याचा दररोजचा भाग असणारे मसाल्याचे पदार्थ अवघ्या जगभरात विविध प्रकारच्या ब्रँड च्या माध्यमातून विकल्या जातात. त्यामध्ये असणारे कृत्रिमता, कृत्रिम गंध, रंग, आणि चव वाढवण्यासाठी केला जाणारा केमिकल्सचा वापर. यामुळेच अधिक नफा कमावण्याच्या या स्पर्धेमध्ये बर्याचदा मानवी जीवनाशी खेळ होतो. आणि हा खेळ नंतर विनाशाकडे घेऊन जातो. अर्थात हे सगळं दुष्टचक्र आहे आणि ते निर्मात्याच्या लक्षात यायला उशीरच होतो. पण पूर्वी म्हटलं जायचं ना युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य आहे. आता असं वाटतंय की त्यात उद्योगही जोडला पाहिजे, कारण पूर्वीसारखे नीतिमत्ताच आता राहिली नाही. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा अशी गोंधळाची स्थिती आज आहे. परंतु तरीसुद्धा काही प्रामाणिकपणे काम करणारी लोक, आहेत जी मानवतावादाचे काम करत आहेत. आणि विनाभेसळ पदार्थाचा वितरण लोकांपर्यंत कसं होईल याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आज आपण "अर्णव मसाले" या नावाने मसाला उद्योगाची सुरुवात केली. प्रामाणिकपणे सेवा देण्याचा माणस आहे. लोकांपर्यंत होईल तितकं मसाल्याचं शुद्ध स्वरूप पोहोचण्याला आमचं प्राधान्य राहील. अर्थातच त्यासाठी इतरांचे सहकार्य लागेल. आणि असं सहकार्य किमान एकदा वापरून पहावं या पातळीचे असले तरी सुद्धा चालेल. त्यामुळेच आपल्याकडून सहकार्याच्या अपेक्षासह धन्यवाद....