05/07/2023
श्री गोविंद धाम मेस.
गांधी पेठ, चिंचवडगाव, पुणे.
9657175056..
आरोग्यम् धनसंपदा.🙏🙏🙏
आरोग्य हा विषय आपण बऱ्याचदा व्यायामाच्या दृष्टिकोनातून पाहतो. आहार हा त्याचा अविभाज्य घटक आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. कमीत कमी व्याधी असणे किंवा व्याधी अजिबात नसणे हे आरोग्याचे मूलभूत मापन असावे. त्या पुढची पायरी म्हणजे मग परफॉर्मन्स, प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादनशीलता ज्याला ज्या पद्धतीने जगायचे तो तेवढ्या परफॉर्मन्सचे ध्येय निश्चित करतो (किंबहुना ते आपोआप निश्चित होते) त्याच्या वरच्या ध्येयसिद्धीसाठी तो प्रयत्न करत नाही. ते त्याच्या मन मेंदूवर गतकाळात काय प्रोग्रामिंग झाले आहे त्यावर अवलंबून असते. त्यानुसार त्याची महत्त्वकांक्षा ठरते पण इथे ज्याने त्याने आपले ध्येय ठरवले असेल त्याला हे समजणे आवश्यक आहे. काही माणसे असतात त्यांना कसलेही ध्येय नसते त्यांच्यासाठी हा लेख नाही. जे माणसे स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल जागृत आहेत किंवा ज्यांना आपला परफॉर्मन्स आणखी चांगला करायचा आहे त्यांच्यासाठी हा लेख थोडाफार उपयोगी होईल अशी अपेक्षा आहे.
तुम्ही जे जेवण जेवत आहात त्यातील सर्व पदार्थ व घटकांबद्दल तुम्ही जागरूक असणे आवश्यक आहे. खास करून मेस मध्ये , हॉटेलमध्ये जेवत आहात तिथे भाज्या, गहू ,तांदूळ कोणता आहे याबद्दल थोडे जागृत रहा. आपण आपल्या गोविंद धाम मेस मध्ये सर्व भाज्या पिंपरी व चिंचवड या भाजी मंडईतून तसेच काही भाज्या आपल्या स्वतःच्या शेतातून आणलेल्या वापरतो. चांगल्या गाळेधारकाकडून भाजी नेहमी महाग पडते परंतु त्या भाजीची क्वालिटी सुद्धा त्या दर्जाची असते. भाज्या कापताना निवडताना शिजवताना त्याला स्वतःचा एक स्वाद असतो तो चांगल्या भाजीचा पटकन लक्षात येतो याउलट (स्पष्ट सांगावे वाटते की) पिंपरी भाजी मंडई च्या पाठीमागे रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांकडून भाजी निम्म्या किमतीमध्ये मिळते पण ती भाजी इतकी उग्र वासाची असते ती कापताना व शिजवताना एवढी उग्र जाणवते की त्यात सर्रास केमिकल वापरले आहे हे समजते. त्या भाज्या कच्च्या जशाच्या तशा चार - पाच दिवस ठेवल्यास सडायला सुरुवात होते. त्यातून केमिकलचा उग्र वास येतो. उदाहरण द्यायचे झाले तर हिरवी मिरची चांगल्या गाळेधारकाकडून शंभर रुपये किलोला मिळते तेच भाजी मंडईच्या पाठीमागे बसलेल्या भाजीवाल्याकडे 50 ते 60 रुपये किलोला मिळते. चांगली मिरची ही पाच-सात दिवसांमध्ये हळूहळू लाल रंगाची होते व नंतर पुढच्या पाच दहा दिवसांमध्ये ती सुरकुत्या पडून सुकायला लागते. याउलट रस्त्याच्या पाठीमागून घेतलेली पन्नास रुपये किलो ची मिरची चार ते पाच दिवसात कागद ओला केल्यासारखा लगद बनून घाण दुर्गंधी सोडायला सुरुवात करते. मित्रांनो हे सर्व पाहिल्यावर त्यात काय घातले असेल त्याच्यावर कोणत्या केमिकलचा मारा केला असेल याची कल्पना करवत नाही. हाच नियम टोमॅटो बटाटा यांसाठी करून पाहिला आहे वेगवेगळ्या प्रकारचे वास त्यांना यायला लागतात
हे पाहिल्यावरती त्या दुर्गंधीची एवढी किळस आली की आयुष्यात परत पिंपरी भाजी मंडईच्या पाठीमागून भाजी न घेण्याचा निर्णय घेतला.या पाठीमागच्या बाजूला रोज सकाळी सहा ते आठ या दरम्यान छोटे-मोठे हॉटेल, मेस व्यावसायिक आपापल्या रिक्षा, टेम्पो, टू व्हीलर घेऊन उभे राहिलेले असतात. ते सर्व पाच ते दहा किलो या प्रमाणात भाज्या घेऊन तिथून निघून जातात कधी वेळ असेल तर नक्की जाऊन पहा. हे सर्व मेस व हॉटेल वाले असतात ज्यांना फक्त न फक्त स्वस्तात भाज्या हव्या असतात . हे इतके स्पष्ट सांगायचे कारण की कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे एखादा धडधाकट निर्व्यसनी पुरुष किंवा एखादी स्त्री अचानकपणे कॅन्सरग्रस्त झालेली ऐकू येते त्यावर वाचनात आले की कॅन्सर ही तर फार शेवटची स्टेज आहे. जे अन्नपदार्थ तुम्ही खात आहात त्यातल्या केमिकल मुळे अनेकांना मानसिक आजार होत चालले आहेत. सायको डीसीस आजकाल अनेक लोकांना लक्षात न राहणे लक्ष केंद्रित न होणे, स्मृती भ्रंश सारखे आजार होत आहेत. त्या विशिष्ठ व्यक्तीला खूप त्रास न झाल्यामुळे तो डॉक्टरकडे जात नाही. परंतु आजार हा काही प्रमाणात झालेला असतो. लक्ष केंद्रित होऊ न शकणे हा आजार बहुतांशी लोकांना आजकाल दिसतो. त्याचे प्रमुख कारण शरीरातील हानिकारक रासायन जे नकळतपणे तुमच्या हॉटेल व मेस च्या जेवणातून पोटात गेले आहेत. आपण शरीराला काय इनपुट देतो त्यानुसार शरीर व मेंदू आपल्याला आउटपुट देणार आहे हे लक्षात राहू दे. त्यामुळे 60 ते 80 रुपये असेही आपण मोजत आहोत मग त्या बदल्यात आपण चांगले जेवण जेवत आहोत का हा प्रश्न स्वतःला करावा. तसाच तो मेस वाल्यालाही कधीतरी करावा किंवा थेट न केल्यास प्रत्येकाने आपापल्या परीने शहानिशा करावी कारण शेवटी एका दिवसामध्ये हा आजार होणार नाहीये तुम्ही अनेक महिने जेव्हा असे केमिकल युक्त जेवता तेव्हा तुमच्या शरीरावर असे विचित्र परिणाम होणार आहेत. मन मेंदू बुद्धी त्या प्रमाणात खंगणार आहे. त्यामुळे मित्रांनो चांगल्या मेस मध्ये हॉटेलमध्ये जेवत जा पुढील लेखात आपण या केमिकलचा मेंदूवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करू.