SHREE Govind DHAM MESS

SHREE Govind DHAM MESS दररोज दळलेल्या गव्हाची ताजी चपाती मिळण्याचे एकमेव ठिकाण.....श्री गोविंद धाम मेस ���

P G for boys cell 9657175056प्रत्येकासाठी स्वतंत्र कपाट / लॉकर. फ्रिज, वॉशिंग मशीन.Wi fi कनेक्शन.फिल्टर केलेले पिण्याचे ...
18/01/2026

P G for boys cell 9657175056
प्रत्येकासाठी स्वतंत्र कपाट / लॉकर.
फ्रिज, वॉशिंग मशीन.
Wi fi कनेक्शन.
फिल्टर केलेले पिण्याचे स्वच्छ पाणी.
जेवणाची उत्तम सोय (ऐच्छिक).
इमर्जन्सी लाईटची सुविधा.
प्रत्येक महिन्याला पेस्ट कंट्रोल.

03/01/2026
24/05/2024

श्री गोविंद धाम मेस.
चिंचवडगाव गांधी पेठ.
चिंचवड पुणे 33.

शाकाहार. (11/5/2024)

1) श्री गोविंद धाम मेस 2013 पासून चिंचवडगाव गांधी पेठ येथे कार्यरत आहे. शुद्ध शाकाहारी जेवण देणे हा आपला उद्देश आहे. फक्त मांसाहार केल्यावरच तृप्त जेवण होते हा अनेक लोकांचा गैरसमज आपण गेल्या अकरा वर्षात दूर केला आहे. उच्च प्रतीचे अन्नधान्य, तेल, मसाले, भाज्या वापरून केलेला स्वयंपाक व त्यातून बनलेले जेवण किती समाधान देऊ शकते हे आपल्या मेस मध्ये वर्षानुवर्ष येणाऱ्या सभासदांकडून ऐकावे. त्यातही जी व्यक्ती पाच ते दहा वर्षे घराबाहेर राहिली आहे व पाच पंचवीस मेस बदलून झाल्या आहेत ती आपल्या मेसचे कौतुक सर्वात जास्त करते. तेव्हा आम्हालाही त्याची तीव्र जाणीव होते. काही अपवादात्मक वाद घालून निघून जातात पण बाहेर आलू मटर ची रस्सा भाजी मागितल्यावर पूर्ण वाटीत पाच-सहा वाटाणे व त्यातील चार वाटाणे मिळून होईल एवढा बटाट्याचा तुकडा असे दोन तुकडे आणि पूर्ण वाटीभर रस्सा जेव्हा मिळते तेव्हा ते पुन्हा आपल्या मेस कडे येतात. अशा साऱ्या अनुभवातून मेसची वाटचाल सुरू आहे.
शुद्ध शाकाहारी जेवण देण्याबरोबरच आता वाळवणीचे पदार्थ जसे की सांडगे, खारोडे कुरडई, भरलेली सुकी मिरची असे पदार्थ बनवून विक्रीस सुरुवात करत आहोत. मटकी डाळ मुगडाळ व चणाडाळ यापासून बनवलेले चविष्ट खमंग सांडगे आजपर्यंत खूप लोकांना आवडले. ते आतापर्यंत ओळखी पाळखीत बनवून देत होतो. आता आपल्या काउंटरवर पॅकेट मधून विक्री सुरू करत आहोत. तसेच ऑनलाईनही विक्री करतो. यातच आपण सर्व लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की भारतासारख्या विविध संस्कृतींमध्ये मध्ये असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असलेल्या प्रदेशात पाहिजे तसे शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. येथे मांसाहाराची काडीमात्र गरज नाहीए. जे काही शरीरास आवश्यक आहे ते सर्व शाकाहारात उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारे आहाराबद्दलचे प्रबोधन जसे आधी सुरू होते तसे सुरूच ठेवणार आहे. वरवर पाहता शाकाहार व मांसाहार हा साधा विषय वाटतो. जर त्याचा अभ्यास केला तर तो किती गंभीर विषय आहे हे समजते. जसजसे अशा प्रकारचे लेख पुढे वाचत जाल तसतसा तुम्हाला या गोष्टीचा उलगडा होईल.

धन्यवाद.💐

Thank you so much for your valuable feedback 🙏🙏🙏🌹🌹🌹
27/07/2023

Thank you so much for your valuable feedback 🙏🙏🙏🌹🌹🌹

श्री गोविंद धाम मेस. गांधी पेठ, चिंचवडगाव, पुणे.9657175056..आरोग्यम् धनसंपदा.🙏🙏🙏आरोग्य हा विषय आपण बऱ्याचदा व्यायामाच्या...
05/07/2023

श्री गोविंद धाम मेस.
गांधी पेठ, चिंचवडगाव, पुणे.
9657175056..

आरोग्यम् धनसंपदा.🙏🙏🙏

आरोग्य हा विषय आपण बऱ्याचदा व्यायामाच्या दृष्टिकोनातून पाहतो. आहार हा त्याचा अविभाज्य घटक आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. कमीत कमी व्याधी असणे किंवा व्याधी अजिबात नसणे हे आरोग्याचे मूलभूत मापन असावे. त्या पुढची पायरी म्हणजे मग परफॉर्मन्स, प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादनशीलता ज्याला ज्या पद्धतीने जगायचे तो तेवढ्या परफॉर्मन्सचे ध्येय निश्चित करतो (किंबहुना ते आपोआप निश्चित होते) त्याच्या वरच्या ध्येयसिद्धीसाठी तो प्रयत्न करत नाही. ते त्याच्या मन मेंदूवर गतकाळात काय प्रोग्रामिंग झाले आहे त्यावर अवलंबून असते. त्यानुसार त्याची महत्त्वकांक्षा ठरते पण इथे ज्याने त्याने आपले ध्येय ठरवले असेल त्याला हे समजणे आवश्यक आहे. काही माणसे असतात त्यांना कसलेही ध्येय नसते त्यांच्यासाठी हा लेख नाही. जे माणसे स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल जागृत आहेत किंवा ज्यांना आपला परफॉर्मन्स आणखी चांगला करायचा आहे त्यांच्यासाठी हा लेख थोडाफार उपयोगी होईल अशी अपेक्षा आहे.
तुम्ही जे जेवण जेवत आहात त्यातील सर्व पदार्थ व घटकांबद्दल तुम्ही जागरूक असणे आवश्यक आहे. खास करून मेस मध्ये , हॉटेलमध्ये जेवत आहात तिथे भाज्या, गहू ,तांदूळ कोणता आहे याबद्दल थोडे जागृत रहा. आपण आपल्या गोविंद धाम मेस मध्ये सर्व भाज्या पिंपरी व चिंचवड या भाजी मंडईतून तसेच काही भाज्या आपल्या स्वतःच्या शेतातून आणलेल्या वापरतो. चांगल्या गाळेधारकाकडून भाजी नेहमी महाग पडते परंतु त्या भाजीची क्वालिटी सुद्धा त्या दर्जाची असते. भाज्या कापताना निवडताना शिजवताना त्याला स्वतःचा एक स्वाद असतो तो चांगल्या भाजीचा पटकन लक्षात येतो याउलट (स्पष्ट सांगावे वाटते की) पिंपरी भाजी मंडई च्या पाठीमागे रस्त्यावर बसलेल्या भाजीवाल्यांकडून भाजी निम्म्या किमतीमध्ये मिळते पण ती भाजी इतकी उग्र वासाची असते ती कापताना व शिजवताना एवढी उग्र जाणवते की त्यात सर्रास केमिकल वापरले आहे हे समजते. त्या भाज्या कच्च्या जशाच्या तशा चार - पाच दिवस ठेवल्यास सडायला सुरुवात होते. त्यातून केमिकलचा उग्र वास येतो. उदाहरण द्यायचे झाले तर हिरवी मिरची चांगल्या गाळेधारकाकडून शंभर रुपये किलोला मिळते तेच भाजी मंडईच्या पाठीमागे बसलेल्या भाजीवाल्याकडे 50 ते 60 रुपये किलोला मिळते. चांगली मिरची ही पाच-सात दिवसांमध्ये हळूहळू लाल रंगाची होते व नंतर पुढच्या पाच दहा दिवसांमध्ये ती सुरकुत्या पडून सुकायला लागते. याउलट रस्त्याच्या पाठीमागून घेतलेली पन्नास रुपये किलो ची मिरची चार ते पाच दिवसात कागद ओला केल्यासारखा लगद बनून घाण दुर्गंधी सोडायला सुरुवात करते. मित्रांनो हे सर्व पाहिल्यावर त्यात काय घातले असेल त्याच्यावर कोणत्या केमिकलचा मारा केला असेल याची कल्पना करवत नाही. हाच नियम टोमॅटो बटाटा यांसाठी करून पाहिला आहे वेगवेगळ्या प्रकारचे वास त्यांना यायला लागतात
हे पाहिल्यावरती त्या दुर्गंधीची एवढी किळस आली की आयुष्यात परत पिंपरी भाजी मंडईच्या पाठीमागून भाजी न घेण्याचा निर्णय घेतला.या पाठीमागच्या बाजूला रोज सकाळी सहा ते आठ या दरम्यान छोटे-मोठे हॉटेल, मेस व्यावसायिक आपापल्या रिक्षा, टेम्पो, टू व्हीलर घेऊन उभे राहिलेले असतात. ते सर्व पाच ते दहा किलो या प्रमाणात भाज्या घेऊन तिथून निघून जातात कधी वेळ असेल तर नक्की जाऊन पहा. हे सर्व मेस व हॉटेल वाले असतात ज्यांना फक्त न फक्त स्वस्तात भाज्या हव्या असतात . हे इतके स्पष्ट सांगायचे कारण की कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे एखादा धडधाकट निर्व्यसनी पुरुष किंवा एखादी स्त्री अचानकपणे कॅन्सरग्रस्त झालेली ऐकू येते त्यावर वाचनात आले की कॅन्सर ही तर फार शेवटची स्टेज आहे. जे अन्नपदार्थ तुम्ही खात आहात त्यातल्या केमिकल मुळे अनेकांना मानसिक आजार होत चालले आहेत. सायको डीसीस आजकाल अनेक लोकांना लक्षात न राहणे लक्ष केंद्रित न होणे, स्मृती भ्रंश सारखे आजार होत आहेत. त्या विशिष्ठ व्यक्तीला खूप त्रास न झाल्यामुळे तो डॉक्टरकडे जात नाही. परंतु आजार हा काही प्रमाणात झालेला असतो. लक्ष केंद्रित होऊ न शकणे हा आजार बहुतांशी लोकांना आजकाल दिसतो. त्याचे प्रमुख कारण शरीरातील हानिकारक रासायन जे नकळतपणे तुमच्या हॉटेल व मेस च्या जेवणातून पोटात गेले आहेत. आपण शरीराला काय इनपुट देतो त्यानुसार शरीर व मेंदू आपल्याला आउटपुट देणार आहे हे लक्षात राहू दे. त्यामुळे 60 ते 80 रुपये असेही आपण मोजत आहोत मग त्या बदल्यात आपण चांगले जेवण जेवत आहोत का हा प्रश्न स्वतःला करावा. तसाच तो मेस वाल्यालाही कधीतरी करावा किंवा थेट न केल्यास प्रत्येकाने आपापल्या परीने शहानिशा करावी कारण शेवटी एका दिवसामध्ये हा आजार होणार नाहीये तुम्ही अनेक महिने जेव्हा असे केमिकल युक्त जेवता तेव्हा तुमच्या शरीरावर असे विचित्र परिणाम होणार आहेत. मन मेंदू बुद्धी त्या प्रमाणात खंगणार आहे. त्यामुळे मित्रांनो चांगल्या मेस मध्ये हॉटेलमध्ये जेवत जा पुढील लेखात आपण या केमिकलचा मेंदूवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करू.

30/06/2023

श्री गोविंद धाम मेस.
चिंचवड गाव. गांधी पेठ,
फोन ९६५७१७५०५६

बॅचलर जीवन जीवन व आहार.

बॅचलर म्हणून घराबाहेर राहताना सर्वात महत्त्वाची अडचण येते ती जेवणाची. घरात व्यवस्थित जेवण जेवण्याची सवय असणाऱ्यांना नंतर बाहेरचे जेवण नको-नको झालेले असते. परंतु शिक्षणासाठी व नोकरीसाठी घराबाहेर लांबच्या ठिकाणी रहावेच लागते. त्यावेळेस घरचे जेवण कसे मिळणार ? कित्येक जणांची तर जास्त पैसे मोजण्याची सुद्धा तयारी असते परंतु आरोग्याच्या दृष्टीने योग्य जेवण मिळणे फार कठीण होऊन बसते. जवळजवळ ते अशक्यच असते.
बॅचलरसाठी एक सांगावेसे वाटते की मुळातच आपण घराबाहेर पडलो आहोत ते आपले आयुष्य आहे त्यापेक्षा चांगले करण्यासाठी ते आपल्याला घरात राहून करता येत नाही. नोकरी किंवा शिक्षण म्हणून ही जी काही धडपड चाललेली आहे ती जीवन चांगले करण्यासाठी आता जीवनमान चांगले करणे हा विषय कमाईवर येऊन थांबतो. जेवढी कमाई जास्त तेवढे जीवन चांगले. ते आपले घराबाहेर पडण्याचे प्रमुख कारण आहे. जीवन मानासाठी चांगले जेवण व राहण्याची उत्तम सोय त्यातही राहण्याच्या सोयी तडजोड करता येते. जसे की 300 स्केअर फुट मध्ये तीन जण/ जणी राहु शकतात आणि दोनशे स्केअर फुट मध्ये सुद्धा राहू शकतात. त्यात तुम्ही तडजोड करू शकता. त्यामुळे तुमच्या मूळ उद्देशावर फारसा परिणाम होत नाही. परंतु जर जेवणच निकृष्ट दर्जाचे मिळाले, जर जेवणाचा दर्जाच नसेल तर मग एवढे धडपड करून काय साध्य केले आणि हे जीवनमान उंचावले म्हणू शकतो का? त्या जेवणासाठी एका ताटाचे 60 रुपये मोजण्याची तयारी सर्वांची असते (काही अपवाद वगळता) असेही ते पैसे मोजावे लागतात. असा कोणताही बॅचलर नसतो/नसते
जो/जी जेवणावर खर्च करत नाही त्याला पैसे खर्च करावेच लागतात आणि हे पैसे खर्चून निकृष्ट दर्जाचे जेवलो तर काय उपयोग ?? म्हणून मध्ये पोटभर जेवण तेही उच्च दर्जाचे अन्नधान्य वापरून मिळत असेल तर तिथे प्राधान्य दिले पाहिजे. घराबाहेर राहिले की जेवणासाठी हॉटेल, मेस,कॅन्टीन यावर अवलंबून राहावे लागते. आता हे हॉटेल मेस चालवणारे 99 टक्के लोक अशिक्षित असतात. हे आपले दुर्दैव आहे परंतु सत्य आहे. मुळातच आर्थिक स्तर खालावलेली माणसे या व्यवसायात असतात ज्यांना स्वतःलाच कधी माहीत नसते की चांगल्या दर्जाचे जेवण म्हणजे काय ? आरोग्यासाठी फायदेशीर काय नुकसानदायक काय ? नाईलाजास्तव त्यांच्याकडे जेवायला येणारे बॅचलर असतातच त्यामुळे त्यांचाही व्यवसाय चालतो आणि त्यांना हे ज्ञान शिकत बसण्याची गरज भासत नाही. बॅचलर त्यांच्याकडे जेवतात आणि आरोग्याचे नुकसान करून घेतात. हे नुकसान इतके भयंकर असते की बॅचलरच्या परफॉर्मन्स व प्रॉटडक्टिविटी वरती दुरगामी दुष्परिणाम होतो. तो बॅचलर्स ना चटकन लक्षात येत नाही. कारण आरोग्याबद्दल तितकेसे शिकवले जात नाही व तेवढी जागृकता नसते. आहाराविषयी सामान्य कुटुंबातील मुलांना फार कमी ज्ञान असते. परंतु निसर्ग नियमाने एखाद्याला ज्ञान असो वा नसो निकृष्ट जेवणाचा आरोग्यावर निश्चितच वाईट परिणाम होतो.
आरोग्याचे नुकसान म्हणजे काय व त्याचा परफॉर्मन्स व प्रॉडक्टीवीटी वर दूरगामी परिणाम म्हणजे काय ? हे पुढील लेखात पाहू.

Address

Audumber, Gandhipeth
Chinchwad
411033

Opening Hours

Monday 8am - 10:30pm
Tuesday 8am - 10:30pm
Wednesday 8am - 10:30pm
Thursday 8am - 10:30pm
Friday 8am - 10:30pm
Saturday 8am - 10:30pm
Sunday 8am - 10:30pm

Telephone

9657175056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHREE Govind DHAM MESS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SHREE Govind DHAM MESS:

Share

Category